Saturday, 14 August 2021

शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये ऑनलाईन स्वातंत्र्यदिन साजरा.







 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये ऑनलाईन स्वातंत्र्यदिन साजरा.*



    *आज दि. 15 ऑगस्ट 2021 वार रविवार रोजी प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्सहामध्ये साजरा करण्यात आला. या स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव श्री शरणप्पा व्हंडरे साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग साहेब, शरणप्पा मलंग विद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष श्री एस. के. मलंग साहेब, शरणप्पा मलंग विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर, कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर आदी मान्यवर उपस्थित होते.*

    *सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर शरणप्पा मलंग विद्यालयतील इयत्ता नववी वर्गातील विद्यार्थिनी शिंदे प्रार्थना माधव या विद्यार्थ्यांनीने स्वातंत्र्य लढ्यातील थोरांचे योगदान या विषयावरती मार्गदर्शन करीत असताना म्हणाली की महात्मा गांधीजींनी इंग्रजांना "भारत छोडो चले जाव" इंग्रजांना नारा दिला. नेताजी सुभाष चंद्रबोस यांनी "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा ।" असे वचन दिले तर "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?" असा सवाल इंग्रजांना बाळ गंगाधर टिळक यांनी विचारले तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली असता तोपर्यंत इंग्रज शासन टिकेल का ? असे भाकीतच केले. क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या क्रांतीवीरांनी तर स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात स्वतःच्या प्राणाची आहुती दिली अश्या असंख्य भारतीयाच्या प्राणाच्या योगदान आतूनच आपला भारत देश स्वतंत्र मिळाले असे ती म्हणाली तर इयत्ता नववी वर्गातील विद्यार्थिनी मंडले ऋतुजा राजेंद्र या विद्यार्थिनीने भारतीय लोकशाहीतील सर्वधर्मसमभाव या विषयावरती आपले मत व्यक्त करीत असताना आपली भारतीय लोकशाही ही समता स्वातंत्र्य व बंधुभाव या त्रिसूत्रीच्या पायावरती उभी राहिली आहे या देशांमध्ये अनेक धर्म जाती एकत्रित गोविंदाने नांदत असतात सर्वधर्मसमभाव हा भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे तर धर्मनिरपेक्षता हा लोकशाहीचा प्राण आहे. असे ती म्हणाली.* 

        *हा स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम विद्यालयातून ऑनलाईन पद्धतीने लाईव्ह दाखविण्यात आला शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या घरामध्ये बसून आपला सहभाग नोंदविला व या स्वातंत्र्य दिनाची उंची वाढविली.*

   *या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. मीनाक्षी जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री ब्रह्मानंद गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाचे ऑनलाईन नियोजन शरणप्पा मलंग विद्यालयातील तंत्रस्नेही शिक्षक श्री परमेश्वर कोळी यांनी केले. या कार्यक्रमाला शरणप्पा मलंग विद्यालयातील सहशिक्षक श्री राजकुमार जाधव, श्री अगतराव मुळे, श्री सतीश कटके, श्री विवेकानंद पाचंगे, श्री बालाजी हिपरगे, श्री परमेश्वर सुतार, श्रीम. प्रभावती बिराजदार, श्रीम. मीनाक्षी हत्ते, श्री कलशेट्टी पाटील श्री दुशंत कांबळे व कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिरातील सर्व शिक्षक वृंद व मोजकीच विद्यार्थी व पालक कोरोना नियमांचे पालन करुन उपस्थित होते.*



🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment