🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*मलंग विद्यालयामध्ये पत्रकार दिनी उमरगा तालुक्यातील पत्रकारांचा भव्य सत्कार*
*http://malangvidhyalay.blogspot.com*
*दि. 06/01/2021 वार बुधवार रोजी 06 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला या वेळी उमरगा तालुक्यातील पत्रकारांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. उमरगा तालुक्याच्या विकासामध्ये पत्रकार बंधूंचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम शरणप्पा मलंग विद्यालयांमध्ये नियोजित करण्यात आला होता.*
*या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री एस. के. मलंग अप्पा हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्कार मूर्ती श्री अविनाश काळे, श्री अंबादास जाधव, श्री मारुती कदम,श्री मनिष सोनी, श्री शंकर बिराजदार, श्री दत्ता नागरे संस्थेचे ज्येष्ठ सदस्य श्री अप्पासाहेब हत्ते, मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर व कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री रविराज रेड्डी सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.*
*प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना श्री अंबादास जाधव म्हणाले की विद्यार्थ्यांनी पत्रकार नाही झाले तरी चालेल परंतु प्रत्येक वर्तमानपत्र हे अतिशय काळजीपूर्वक वाचून त्याच्या अग्रलेखाचे संग्रह करावे हे क्रीडा, ललित, साहित्य, राजकीय बातम्या चालू, घडामोडी यांचा संग्रह करण्याचा छंद जरी विद्यार्थ्यांनी जोपासला तरी त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकसित होतो व वर्तमानपत्रातील शालेय स्पर्धा परीक्षेचे सहज संकलन केले तरी आपण कोणतेही स्पर्धापरीक्षा देऊन खूप मोठे अधिकारी होऊ शकतो. वर्तमानपत्र हे आपले मित्र आहेत वर्तमानपत्र समाजातील घडामोडीवरती लक्ष ठेवून त्यांना शब्दबद्ध करतात तेच शब्द सुविचार होतात हे सुविचार सूज्ञ वाचक वाचतात व तसेच कृती करतात त्या कृतीवरती वर्तमानपत्रे लक्ष ठेवतात तीच वाचकांची सवय होते. जे वर्तमानपत्रे वाचकाच्या सवयीवरती लक्ष ठेवतात ती वर्तमानपत्रे व्यक्तींचे चरित्र घडवितात आणि त्या चरित्रांचा अध्ययन करणारे विद्यार्थी देशाचे भविष्य घडवीतात म्हणून वर्तमानपत्र हे तुमचे चरित्र घडविणारे विश्वासू मित्र आहेत आणि हे वर्तमानपत्र निर्माण करणारे झुंजार पत्रकार हे सुशिक्षित समाजाचे शिल्पकार आहे असे ते म्हणाले. तरी या वेळी भव्य सत्काराला उत्तर देत असताना पत्रकार शंकर बिराजदार म्हणाले की प्रत्येक पत्रकार हा कोणाच्याही विरोधामध्ये नसतो तर तो वर्तमानपत्राच्या आरशामध्ये समाजाचा चेहरा दाखवीत असतो. म्हणून विद्यार्थ्यांनी येणाऱ्या प्रसंगाला निर्भीडपणे तोंड दिल्यास आयुष्यात काही होता नाही आले तरी आमच्या सारखा निर्भीड पत्रकार निश्चित होऊ शकता असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.*
*या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करीत असताना श्री अजित गोबारे सर म्हणाले की, शरणप्पा मलंग विद्यालयाच्या प्रसिद्धी रुपी इमारतीचे पत्रकार हे आधारस्तंभ आहेत जो पर्यंत हे पत्रकारीतेचेस्तंभ आमच्या पाठीशी आहेत तोपर्यंत शरणप्पा मलंग विद्यालय हे नाव प्रसिद्धीच्या अग्रस्थानी राहिल. यावर्षीचा उदगीरमधून दिला जाणारा शोध वार्ता पुरस्कार श्री अविनाश काळे व शंकर बिराजदार यांना मिळाला हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला यापेक्षाही खूप मोठे पुरस्कार भावी काळात उमरग्याच्या पत्रकारांना मिळावे हीच आमची इच्छा आहे असे ते म्हणाले जोपर्यंत हे सर्व पत्रकार आम्हाला त्यांच्या मनात ठेवतील तोपर्यंत आम्ही त्यांच्या रुणामध्ये राहू इच्छितो असे ते म्हणाले. एका गल्ली बोळामध्ये सुरु झालेल्या छोट्या शाळेला भव्य स्वरूप प्राप्त करून देण्याबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव होण्याचे भाग्य जर कोणी मिळवून दिले असेल तर आमच्या सर्व स्नेही पत्रकार मित्रांनी दिले आहे म्हणून मी त्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानतो असे ते म्हणाले.*
*हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मलंग विद्यालयातील सहशिक्षक राजकुमार जाधव, अगतराव मुळे, विवेकानंद पाचंगे, परमेश्वर कोळी, प्रभावती बिराजदार, मीनक्षी हत्ते, कलशेट्टी पाटील, मोहन साखरे, दुषंत कांबळे व कुमारास्वामी प्राथमिक विद्यामंदिरातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.*