अध्यक्ष
डॉ. एम. एस. मलंग साहेब
💠वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा
थोडक्यात माहिती :-
थोडक्यात माहिती :-
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶
वीरशैव समाजसेवा मंडळाची स्थापना दिनांक 12-10- 1998 रोजी झाली. सर्वप्रथम बालवाडी ची स्थापना केली समाजातील शिक्षणप्रेमी लोकांपासून चांगला प्रतिसाद मिळत गेला. बालवाडीच्या वर्गाला प्राथमिक शाळा करण्यासाठी आमच्या मंडळाचे अध्यक्ष- डॉ. एम. एस.मलंग साहेब यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नाला यशस्वी करण्यासाठी राज्यमंत्री आपल्या पैगंबर वाशी खालिकमियाँ काझी साहेब यांनी आपल्या शिफारसी पत्रानुसार मान्यता दिली.
शैक्षणिक वर्ष 1991-92 साली. पहिली चा वर्ग चालू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली. शैव लिंगायत समाज संस्था यांच्या मालकीची चौकी मठाची जागा मिळाली. या शाळेचे उद्घाटन जिडगीचेड महाराज श्री श्री श्री 1008 षडाक्षरी सिद्धेश्वर महाराज स्वामीजी यांच्याहस्ते झाले नंतर शाळेचे नामकरण वीरशैव समाजसेवा मंडळ संचलित - कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदिर असे झाले.
आमची प्राथमिक शाळा पहिली ते सातवी पर्यंत आहे. या शाळेमध्ये एकूण 700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . शाळेसाठी जागा अपुरी पडत असल्याचे पाहून बालवाडी साठी जागा श्री आशोकराव खजगी यांनी विनामोबदला वापरण्यासाठी दिलेला आहे. भविष्यात शाळेत इमारत स्वतंत्र होण्यासाठी श्रीमती शांताबाई संगप्पा माशाळकर यांनी आपल्या मालकी हक्काची जागा विनामोबदला मंडळाच्या नावे दानपत्र करून दिले. सतत धडपडणाऱ्या व्यक्तींचेही आमाला चांगले सहकार्य लाभले. त्यामध्ये व्यापारी वर्ग, सेवाभावी संस्था, डॉक्टर, शासकीय अधिकारी, व इतर प्रतिष्ठित नागरिकांचे सहकार्य लागले.
वीरशैव समाज सेवा मंडळाची प्रगती करण्यासाठी सतत धडपड करणारे मंडळाचे अध्यक्ष - डॉ. एम. एस. मलंग साहेब वडिलांचे कार्य पावती म्हणून आमच्या मंडळाने एक ठराव घेऊन सन -2000- 2001 मध्ये माध्यमिक शाळेचा प्रस्ताव सादर केला व मंडळातील सर्व पदाधिकारी व सभासदाने स्वंयप्रेरणेने माध्यमिक शाळेला कै. शरणप्पा मलंग विद्यालय असे नाव देण्याचा ठराव पास केला. त्यानुसार आठवीचा वर्ग सुरू करण्यात आला. या माध्यमिक शाळेकरीता श्री कल्याणप्पा शरणप्पा मलंग व श्री मल्लिनाथ शरणप्पा मलंग या दोन्ही बंधूंनी आपल्या मालकीची जागा या शाळेत लिहून दिली.
शैक्षणिक वर्ष 2003 या वर्षात मा. बसवराजी पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने आम्हाला माध्यमिक शाळा चालु करण्याची परवानगी शासनाने दिली.
आज रोजी कै. शरणाप्पा मलंग विद्यालयामध्ये मराठी,सेमी माध्यमांमध्ये एकूण 550 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
🔸🔹🔺🔸🔹🔺🔸🔹🔺🔸🔹🔺🔸🔹🔺🔸
आमची प्राथमिक शाळा पहिली ते सातवी पर्यंत आहे. या शाळेमध्ये एकूण 700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . शाळेसाठी जागा अपुरी पडत असल्याचे पाहून बालवाडी साठी जागा श्री आशोकराव खजगी यांनी विनामोबदला वापरण्यासाठी दिलेला आहे. भविष्यात शाळेत इमारत स्वतंत्र होण्यासाठी श्रीमती शांताबाई संगप्पा माशाळकर यांनी आपल्या मालकी हक्काची जागा विनामोबदला मंडळाच्या नावे दानपत्र करून दिले. सतत धडपडणाऱ्या व्यक्तींचेही आमाला चांगले सहकार्य लाभले. त्यामध्ये व्यापारी वर्ग, सेवाभावी संस्था, डॉक्टर, शासकीय अधिकारी, व इतर प्रतिष्ठित नागरिकांचे सहकार्य लागले.
वीरशैव समाज सेवा मंडळाची प्रगती करण्यासाठी सतत धडपड करणारे मंडळाचे अध्यक्ष - डॉ. एम. एस. मलंग साहेब वडिलांचे कार्य पावती म्हणून आमच्या मंडळाने एक ठराव घेऊन सन -2000- 2001 मध्ये माध्यमिक शाळेचा प्रस्ताव सादर केला व मंडळातील सर्व पदाधिकारी व सभासदाने स्वंयप्रेरणेने माध्यमिक शाळेला कै. शरणप्पा मलंग विद्यालय असे नाव देण्याचा ठराव पास केला. त्यानुसार आठवीचा वर्ग सुरू करण्यात आला. या माध्यमिक शाळेकरीता श्री कल्याणप्पा शरणप्पा मलंग व श्री मल्लिनाथ शरणप्पा मलंग या दोन्ही बंधूंनी आपल्या मालकीची जागा या शाळेत लिहून दिली.
शैक्षणिक वर्ष 2003 या वर्षात मा. बसवराजी पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने आम्हाला माध्यमिक शाळा चालु करण्याची परवानगी शासनाने दिली.
आज रोजी कै. शरणाप्पा मलंग विद्यालयामध्ये मराठी,सेमी माध्यमांमध्ये एकूण 550 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
🔸🔹🔺🔸🔹🔺🔸🔹🔺🔸🔹🔺🔸🔹🔺🔸
No comments:
Post a Comment