माझे पहिले भाषण :-
आठवीत असताना लाल बहाद्दुर शास्त्रीजींच्याजयंतीनिमित्त आमच्या शाळेत भाषणे ठेवली होती .मुख्याध्यापकांनी सर्व वर्गशिक्षकांकडुन कमीतकमी दोनविद्यार्थ्यांचे प्रत्येक वर्गातुन भाषन हवे असे बजावले . आमच्यासंपुर्ण शाळेची पटसंख्या तीनशेच्या घरात होती . भाषणकरावयाचे आहे , ही नोटिस प्राथने वेळीच सांगितली होती .
वर्ग सुरु झाले . आमच्या वर्ग शिक्षीका जोशी बाईहोत्या . त्या वर्गात आल्या व त्यांनी आपल्या वर्गातुन कोणभाषण करणार ? असा प्रश्न विचारला . सर्व मुले एक दुसर्याचेनाव सांगु लागली .तर काही मुले बाईंना आपला चेहराच दिसुनये म्हणुन पुढच्या मुलांच्या पाठीमागे तोंड लपवु लागले . अशामुलांमध्ये प्रामुख्याने माझा समावेश होत होता . बाईंनी सर्वमुलांना शांत बसवले व ती दोन नावे जाहिर केली जी आठवीच्यावर्गाकडुन भाषणे करणार होती . सुहेल बोबडे व ओंकार सुतार. काय ? सुहेल बोबडे . माझ्या छातीचा ठोका चुकला बाईंनानाहीतरी कसे म्हणु मी बुचकळ्यात पडलो . मात्र माझा खासमित्र ओंकार त्याच्यातर चेह-यावरची रेष ही हलली नाही . याचाअर्थ असा नाही की तो फर्डा वक्ता होता . तर तो घाबरुनगोंधळुन जायचा नाही . मी समजुन गेलो होतो की आम्हादोघांचच नाव का घेतल गेलय .कारण आम्ही एकाच बाकावरबसुन अभ्यास कमी व गप्पा गोष्टी अधिक करायचो .
दुस-या दिवशी भाषण करायचे होते . दांडी मारुनचालणार न्हवते . निबंधमाला काढल्या त्यातही त्यांची हवी तशीमाहिती मिळत न्हवती . जी होती ती मला फारच सामान्य वाटुलागली . मला त्यावेळी इंटरनेट हताळता वापरता येत न्हवते .नाहीतर मला गुगलची बरीच मदत झाली असती . मीनिबंधमालिकेतुन शास्त्रीजींची जन्म व मृत्यु दिनांक पाठ करुनठेवली व त्याव्यातीरिक्त इतर माहिती कितीही वाचली तरीडोक्यातुन निघुन जात होती .
दुस-या दिवशी लाल बहाद्दुर शास्त्रींचा जयंती कार्यक्रमसुरु झाला . प्रतिमा पुजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला .अध्यक्षांचेमनोगत झाले . यानंतर लगेचच विद्यार्थ्यांची भाषणे सुरु झाली .पाचवी सहावीच्या लहान मुलांपासुन सुरुवात झाली . मीमनातल्या मनात तयार केलेल्या पाठांतराचा सराव करु लागलो .काही वाक्य लक्षात राहत न्हवती . त्या वाक्यांना डोक्याच्या सर्वभागात चाचपडुन पुन्हा लक्षात आणण्याचा प्रयत्न करु लागलो .त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची भाषणे होत होती ती लक्षपुर्वकऐकुन माहिती साठवत होतो , निदान संकट समयी उपयोगालायावीत म्हणुन .
हळूहळू माझा नंबर जवळ येत चालला होता .माझ्या भोवताली भितीचा विळखा घट्ट होत चालला होता .सुत्रसंचालकाने माझ्या मित्राचे ओंकारचे नाव घेतले . मीत्याच्याकडे पाहिले .मात्र तो जागचा हलला देखिल नाही . पुन्हापुन्हा त्याचे नाव घेण्यात आले .त्याने साफ दुर्लक्ष केले व तसाचबसुन राहिला .ओंकारची मुत्सदेगीरी मी देखिल करावी का ?असा विचार मी करत असतानाच माझे नाव पुकारण्यात आले .मी दचकुन उभा राहिलो . ज्याचे नाव घेतले जायचे त्याविद्यार्थ्याकडे सर्वजण उत्सुकतेने बघायचे . त्यामुळे सर्वजणमाझ्याकडे बघत आहेत या विचाराने भितीची भर अधिक झाली.
माझे पाय माझ्या नकळत विचारपिठाकडे चालुलागले . शाळेतील सर्व मुले एकाच वेळी एकाच ठिकाणी कशीदिसतात हे मी विचारपिठावरुन प्रथमच पाहत होतो . माझ्याहातात वायरलेस माइक देण्यात आला .एखाद्यावेळी तोल जाऊनये म्हणून खांबाचा आधार घ्यावा त्या प्रमाणे मी माइक ला घट्टधरुन त्याचा आधार घेण्याचा प्रयत्न करत होतो . पाय लटपटतहोते . उजव्या बाजुला सर्व शिक्षकवृंद होता .डाव्या बाजुलासाऊंड सिस्टीम ऑपरेटर तर समोर सर्व विद्यार्थी होते .
तसे तिथे आणखी ही कोणी होते ती म्हणजे भयाण शांतता तीशांतता पुढे आलेल्या विद्यार्थ्याच्या भाषणाने निघुन जाणार होती. पण माझ्या तोंडातुन शब्द फुटेनात आता काय ?
मी ठरवले कोणाकडेही पाहायचे नाही . मीमाझी जी मान 90' अंश काटकोनात उभी होती ती लघुकोनातघेतली व बोलायला लागलो . अडखळत अडखळत त्यांचाजन्मदिन सांगितला व नंतर जे पाठ होते ते डोक्यातुन पुर्णपणेभूईसपाट झाले होते .मग मी ज्या मुलांचे अगोदर भाषण झालेहोते त्यांच्यातील काही मुद्दे ढापुन बोलायला लागलो . पण त्यावाक्यांमध्ये देखिल समांतरपणा न्हवता . अं अं अं हे अं मीवाक्यात चार पाच वेळा बोलु लागलो . पाय अजुनही लटपटतहोते . हळूहळू मला भितीने घाम फुटू लागला . जे शब्द बाहेरपडायचे त्याची वाक्यरचना सरळ होत न्हवती . इतक्यातकोणीतरी पाठीवर हाथ ठेवला , आणि आवाज आला "असु देबोल बरोबर आहे" . त्या आमच्या मराठीच्या पाटिल टिचरहोत्या . टिचरांनी मला ऐकु जाइल अशा आवाजात प्रोत्साहनदिले . माझी भिती कमी झाली . पाठ केलेले थोडे थोडे लक्षातयेवू लागले . मोडक्या तोडक्या शब्दात मी माझे भाषण पुर्ण केले. जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून इतका वेळ जो माइक मी घट्टधरला होता तो परत केला व यशस्वी पाउलांनी जागेवर येवुनबसलो .
यानंतर मी एकही संधी सोडली नाही . सर्वकार्यक्रमांमध्ये माझ्या इतर मित्रांप्रमाणे भाग घेऊ लागलो .परिपाठात बोधकथा , विनोद व प्रश्नमंजुषा मुद्दामहून मीचघ्यायचो . शनिवारी होणा-या इंग्लीश क्लब मध्ये ही सहभागीहोऊ लागलो .ज्या स्टेजची भिती वाटत होती त्या स्टेजवर केंव्हामाझे नाव घेतात व केंव्हा मी जातोय अस होऊ लागले . 9 वी10 वी या दोन वर्षांमध्ये तर मी एका विशिष्ट अशा गटामध्येगणला जाऊ लागलो कि ज्यांना कोणत्याही कार्यक्रमाच्यासहभागासाठी विचारले जायचे नाही तर त्यांचे नाव हे सहभागीविद्यार्थ्यांच्यामध्ये असायचेच .
अर्थातच माझ्या या स्टेज डेअरींग मागे पाटिलटिचर यांचा सिंहाचा वाटा होता . कारण त्या भाषणावेळी जरत्यांनी मला धीर देऊन प्रोत्साहन दिले नसते तर मग तुम्हीकल्पना करु शकता . माझा न्यूनगंड वाढतच गेला असता आणिमी प्रभावीपणे बोलू शकलो नसतो . आज कधीही विचारपीठावरजायची संधी मिळाली तर मला तो प्रसंग डोळ्यासमोर येतो .
असे हे माझे पहिले भाषण .
🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄
अन्यअन्य भारतीयांप्रमाणे मीही क्रिकेटचा चाहता आहे. शाळेत शिकत असताना भारतीय संघाच्या तसेच इतर संघांच्याही मी बऱ्याच मॅचेस पाहील्या आहेत. परंतु, भारत व पाकिस्तान मध्ये झालेला तो सामना मला मी पाहिलेला आजवरचा सर्वात थरारक सामना वाटतो.
१९९८ सालच्या शेवटच्या कालावधीमध्ये हा सामना झाला होता. या वर्षी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, व श्रीलंका या देशांतील आशिया कप बांगलादेशात भरविण्यात आला होता. श्रीलंका व बांगलादेश मात्र अंतिम फेरीपुर्वी बाद झाले. व भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल झाली होती. ढाक्यामध्ये हा सामना खेळविण्यात आला. या काळात भारत व पाकिस्तानचे राजकीय संबंध फरसे चांगले नव्हते. त्यात दोन्ही देश पारंपारीक प्रतिस्पर्धी असल्याने निश्चितच हा सामना चुरशीचा ठरला.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३१७ धावा केल्या होत्या व त्याही केवळ ४८ षटकांमध्ये! या काळात ३०० च्या वर धावा करणे म्हणजे प्रतिस्पर्ध्यांवर मातच करण्यासारखे होते. या सामन्यापर्यंत केवळ एकदाच तिनशेच्या वर धावा केल्यावरही नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला होता. ५-६ वर्षांपुर्वी श्रीलंकेलेच झिम्बाब्वे संघाला ३१६ धावा करुन मात दिली होती. त्यामुळे अशिया कपच्या अंतिम सामन्याच्या दिवशी पहिल्या डावानंतर पाकिस्तानचे पारडे निश्चितच जड झाले होते. भारताच्या विजयाबद्दल बहुतांश जण साशंकच होते. पण, आमच्यासारखे क्रिकेटप्रेमी मात्र आज भारतीय संघ चमत्कार करु शकतो अशी आशा बाळगुन होते! सामना खुपच चुरशीचा झाला. सलामीचा फलंदाज सौरव गांगुलीने कमी चेंडुंमध्ये १२४ धावा तडकाविल्या. त्याची खेळी मात्र जिगरबाज होती. शिवाय त्याला रॉबिन सिंगची ८२ धावांची उत्तम साथ लाभली. दोघांची पुर्ण इनिंग्ज पाहताना मी जागचा हाललो देखील नव्हतो. पण, सामन्याच्या अंतिम चरणात दोघेही बाद झाले. तेव्हा भारत हा सामना हरणार असे वाटु लागले. भारतीय फलंदाजीचे केवळ शेपूट बाकी असताना शेवटच्या षटकात ११ धावा हव्या होत्या. व सकलेन मुश्ताक़ हा पाकिस्तानी फिरकी गोलंदाज गोलंदाजीसाठी आला. पाच चेंडू टाकुन झाल्यावर शेवटच्या चेंडुवर तीन धावा भारताला विजयासाठी हव्या होत्या. आणि फलंदाजीसाठी हृषिकेश कानिटकर उभा होता. आता केवळ एकाच बॉलमध्ये निकाल लागणार म्हणुन माझ्या हृदयाचे ठोके खुपच वाढले होते. अखेर सकलेनने बॉल टाकला व कानिटकरने तो मिड ऑफच्या डोक्यावरुन थेट सीमापार धाडला. तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. तेव्हापासुन आजवर मी त्याइतका थरारक सामना पाहिला नाही....! भारताने सर्वोच्च धावा पार करुन विजयाचा नवा उच्चांक गाठला होता. भारतीयांप्रमाणे मीही क्रिकेटचा चाहता आहे. शाळेत शिकत असताना भारतीय संघाच्या तसेच इतर संघांच्याही मी बऱ्याच मॅचेस पाहील्या आहेत. परंतु, भारत व पाकिस्तान मध्ये झालेला तो सामना मला मी पाहिलेला आजवरचा सर्वात थरारक सामना वाटतो.
१९९८ सालच्या शेवटच्या कालावधीमध्ये हा सामना झाला होता. या वर्षी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, व श्रीलंका या देशांतील आशिया कप बांगलादेशात भरविण्यात आला होता. श्रीलंका व बांगलादेश मात्र अंतिम फेरीपुर्वी बाद झाले. व भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल झाली होती. ढाक्यामध्ये हा सामना खेळविण्यात आला. या काळात भारत व पाकिस्तानचे राजकीय संबंध फरसे चांगले नव्हते. त्यात दोन्ही देश पारंपारीक प्रतिस्पर्धी असल्याने निश्चितच हा सामना चुरशीचा ठरला.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३१७ धावा केल्या होत्या व त्याही केवळ ४८ षटकांमध्ये! या काळात ३०० च्या वर धावा करणे म्हणजे प्रतिस्पर्ध्यांवर मातच करण्यासारखे होते. या सामन्यापर्यंत केवळ एकदाच तिनशेच्या वर धावा केल्यावरही नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला होता. ५-६ वर्षांपुर्वी श्रीलंकेलेच झिम्बाब्वे संघाला ३१६ धावा करुन मात दिली होती. त्यामुळे अशिया कपच्या अंतिम सामन्याच्या दिवशी पहिल्या डावानंतर पाकिस्तानचे पारडे निश्चितच जड झाले होते. भारताच्या विजयाबद्दल बहुतांश जण साशंकच होते. पण, आमच्यासारखे क्रिकेटप्रेमी मात्र आज भारतीय संघ चमत्कार करु शकतो अशी आशा बाळगुन होते! सामना खुपच चुरशीचा झाला. सलामीचा फलंदाज सौरव गांगुलीने कमी चेंडुंमध्ये १२४ धावा तडकाविल्या. त्याची खेळी मात्र जिगरबाज होती. शिवाय त्याला रॉबिन सिंगची ८२ धावांची उत्तम साथ लाभली. दोघांची पुर्ण इनिंग्ज पाहताना मी जागचा हाललो देखील नव्हतो. पण, सामन्याच्या अंतिम चरणात दोघेही बाद झाले. तेव्हा भारत हा सामना हरणार असे वाटु लागले.
भारतीय फलंदाजीचे केवळ शेपूट बाकी असताना शेवटच्या षटकात ११ धावा हव्या होत्या. व सकलेन मुश्ताक़ हा पाकिस्तानी फिरकी गोलंदाज गोलंदाजीसाठी आला. पाच चेंडू टाकुन झाल्यावर शेवटच्या चेंडुवर तीन धावा भारताला विजयासाठी हव्या होत्या. आणि फलंदाजीसाठी हृषिकेश कानिटकर उभा होता. आता केवळ एकाच बॉलमध्ये निकाल लागणार म्हणुन माझ्या हृदयाचे ठोके खुपच वाढले होते. अखेर सकलेनने बॉल टाकला व कानिटकरने तो मिड ऑफच्या डोक्यावरुन थेट सीमापार धाडला. तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. तेव्हापासुन आजवर मी त्याइतका थरारक सामना पाहिला नाही....! भारताने सर्वोच्च धावा पार करुन विजयाचा नवा उच्चांक गाठला होता.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३१७ धावा केल्या होत्या व त्याही केवळ ४८ षटकांमध्ये! या काळात ३०० च्या वर धावा करणे म्हणजे प्रतिस्पर्ध्यांवर मातच करण्यासारखे होते. या सामन्यापर्यंत केवळ एकदाच तिनशेच्या वर धावा केल्यावरही नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला होता. ५-६ वर्षांपुर्वी श्रीलंकेलेच झिम्बाब्वे संघाला ३१६ धावा करुन मात दिली होती. त्यामुळे अशिया कपच्या अंतिम सामन्याच्या दिवशी पहिल्या डावानंतर पाकिस्तानचे पारडे निश्चितच जड झाले होते. भारताच्या विजयाबद्दल बहुतांश जण साशंकच होते. पण, आमच्यासारखे क्रिकेटप्रेमी मात्र आज भारतीय संघ चमत्कार करु शकतो अशी आशा बाळगुन होते! सामना खुपच चुरशीचा झाला. सलामीचा फलंदाज सौरव गांगुलीने कमी चेंडुंमध्ये १२४ धावा तडकाविल्या. त्याची खेळी मात्र जिगरबाज होती. शिवाय त्याला रॉबिन सिंगची ८२ धावांची उत्तम साथ लाभली. दोघांची पुर्ण इनिंग्ज पाहताना मी जागचा हाललो देखील नव्हतो. पण, सामन्याच्या अंतिम चरणात दोघेही बाद झाले. तेव्हा भारत हा सामना हरणार असे वाटु लागले. भारतीय फलंदाजीचे केवळ शेपूट बाकी असताना शेवटच्या षटकात ११ धावा हव्या होत्या. व सकलेन मुश्ताक़ हा पाकिस्तानी फिरकी गोलंदाज गोलंदाजीसाठी आला. पाच चेंडू टाकुन झाल्यावर शेवटच्या चेंडुवर तीन धावा भारताला विजयासाठी हव्या होत्या. आणि फलंदाजीसाठी हृषिकेश कानिटकर उभा होता. आता केवळ एकाच बॉलमध्ये निकाल लागणार म्हणुन माझ्या हृदयाचे ठोके खुपच वाढले होते. अखेर सकलेनने बॉल टाकला व कानिटकरने तो मिड ऑफच्या डोक्यावरुन थेट सीमापार धाडला. तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. तेव्हापासुन आजवर मी त्याइतका थरारक सामना पाहिला नाही....! भारताने सर्वोच्च धावा पार करुन विजयाचा नवा उच्चांक गाठला होता. भारतीयांप्रमाणे मीही क्रिकेटचा चाहता आहे. शाळेत शिकत असताना भारतीय संघाच्या तसेच इतर संघांच्याही मी बऱ्याच मॅचेस पाहील्या आहेत. परंतु, भारत व पाकिस्तान मध्ये झालेला तो सामना मला मी पाहिलेला आजवरचा सर्वात थरारक सामना वाटतो.
१९९८ सालच्या शेवटच्या कालावधीमध्ये हा सामना झाला होता. या वर्षी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, व श्रीलंका या देशांतील आशिया कप बांगलादेशात भरविण्यात आला होता. श्रीलंका व बांगलादेश मात्र अंतिम फेरीपुर्वी बाद झाले. व भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल झाली होती. ढाक्यामध्ये हा सामना खेळविण्यात आला. या काळात भारत व पाकिस्तानचे राजकीय संबंध फरसे चांगले नव्हते. त्यात दोन्ही देश पारंपारीक प्रतिस्पर्धी असल्याने निश्चितच हा सामना चुरशीचा ठरला.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३१७ धावा केल्या होत्या व त्याही केवळ ४८ षटकांमध्ये! या काळात ३०० च्या वर धावा करणे म्हणजे प्रतिस्पर्ध्यांवर मातच करण्यासारखे होते. या सामन्यापर्यंत केवळ एकदाच तिनशेच्या वर धावा केल्यावरही नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला होता. ५-६ वर्षांपुर्वी श्रीलंकेलेच झिम्बाब्वे संघाला ३१६ धावा करुन मात दिली होती. त्यामुळे अशिया कपच्या अंतिम सामन्याच्या दिवशी पहिल्या डावानंतर पाकिस्तानचे पारडे निश्चितच जड झाले होते. भारताच्या विजयाबद्दल बहुतांश जण साशंकच होते. पण, आमच्यासारखे क्रिकेटप्रेमी मात्र आज भारतीय संघ चमत्कार करु शकतो अशी आशा बाळगुन होते! सामना खुपच चुरशीचा झाला. सलामीचा फलंदाज सौरव गांगुलीने कमी चेंडुंमध्ये १२४ धावा तडकाविल्या. त्याची खेळी मात्र जिगरबाज होती. शिवाय त्याला रॉबिन सिंगची ८२ धावांची उत्तम साथ लाभली. दोघांची पुर्ण इनिंग्ज पाहताना मी जागचा हाललो देखील नव्हतो. पण, सामन्याच्या अंतिम चरणात दोघेही बाद झाले. तेव्हा भारत हा सामना हरणार असे वाटु लागले.
भारतीय फलंदाजीचे केवळ शेपूट बाकी असताना शेवटच्या षटकात ११ धावा हव्या होत्या. व सकलेन मुश्ताक़ हा पाकिस्तानी फिरकी गोलंदाज गोलंदाजीसाठी आला. पाच चेंडू टाकुन झाल्यावर शेवटच्या चेंडुवर तीन धावा भारताला विजयासाठी हव्या होत्या. आणि फलंदाजीसाठी हृषिकेश कानिटकर उभा होता. आता केवळ एकाच बॉलमध्ये निकाल लागणार म्हणुन माझ्या हृदयाचे ठोके खुपच वाढले होते. अखेर सकलेनने बॉल टाकला व कानिटकरने तो मिड ऑफच्या डोक्यावरुन थेट सीमापार धाडला. तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. तेव्हापासुन आजवर मी त्याइतका थरारक सामना पाहिला नाही....! भारताने सर्वोच्च धावा पार करुन विजयाचा नवा उच्चांक गाठला होता.
💐🌲💐🌲💐🌲💐🌲💐🌲💐🌲💐🌲💐🌲
: आठवणीतला पाऊस निबंध
गंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत आहेत. गारवा घेऊन आलेला वारा अंगावरून अलगद मोरपीस फिरवतोय. झाडे पावसाच्या वर्षावात सुस्नात न्हाऊन आपल्या नितळ अंगकांतीकडे कुतूहलाने पाहत उभी आहेत. दूर क्षितिजावर इंद्रधनुष्याने सप्तरंगी कमान धरली आहे. ढगांआडून डोके अलगद वर काढून सूर्य बघतो आहे. पक्षांनी निळ्याशार आभाळाच्या विस्तीर्ण पटावर आपल्या पंखांनी फेर धरला आहे. त्यांच्या मोहक हालचालींनी आभाळभर नक्षी कोरली जात आहे. श्रावणातील ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ रंगला आहे. टेकड्यांच्या उतारावरून पाणी अवखळ पोराप्रमाणे उड्या मारीत धावते आहे. माळावरील गवत वाऱ्यासोबत झुलत, डुलत खेळते आहे. आजूबाजूच्या आसमंतात प्रसन्न चैतन्य ओसंडून वाहते आहे. हिरव्या माळरानावरून वाहत येणारा वारा मंत्रमुग्ध करणाऱ्या गंधाची सरमिसळ सोबतीला घेऊन येतोय. परिसरातील उत्साहाने आनंदाचा सूर धरला आहे. त्या सुरांनी मनःपटलावर गारुड केले आहे. डोक्यावरील पावसाळी आभाळाचा तुकडा मनाच्या गाभाऱ्यात साठत चालला आहे. पायाखालच्या माळाच्या चौकटीत पाऊले फिरताना मनातील स्मृतींचे कोष आठवणींनी ओलावून चिंबचिंब भिजत आहेत. भिजलेल्या देहावरून निथळणाऱ्या पावसासोबत मनातील पावसाळी आकाश हलकेच धरतीवर उतरत आहे. कळत नकळत तिकडे पावलं आतुरतेने चालती होतात. मनातील साठलेले झरे मोकळे होऊन वाहत राहतात.
किती दिवस, महिने, वर्षे झाली असतील डोईवरच्या निळ्याभोर विस्तीर्ण आकाशाला मनात साठवून याचा हिशोब मन करतंय. तो जुळत नाही. कारण स्वतःभोवती आखून घेतलेल्या स्वयंघोषित चौकटीत हे मुक्त आकाश नाही सामावत. आठवणींचा पाऊस दाटत जातो. मन आठवणींच्या ओथंबलेल्या झाडाखाली क्षणभर विसावते. नेणतेपणापासून ते जाणतेपणापर्यंत अनुभवलेला मनमुक्त पाऊस आणि आजचा स्वतःभोवती कोरून घेतलेल्या रेखीव चौकटीतला पाऊस, केवढं अंतराय निर्माण झाले आहे भिजलेल्या सहवासाच्या नात्यात. मध्यमवर्गीय बेगडी आवरणात जगण्याचा मुक्त आनंद मी कधीच झाकून घेतला आहे. वयासोबत शहाणपण आलं; पण जगण्यातलं सहजपण मात्र हरवलं. शहराच्या मध्यमवर्गीय सुखांच्या खिडकीतील आकाशाला डोक्यावरचं ते अफाट आकाश पेलणं अवघड होतंय. माणूस शिकून शहाणा होतो; पण त्याचं शहाणपण पुस्तकांत बंदिस्त होताना जीवनातून पाऱ्यासारखे अलगद निसटत जातं. हरवत जातं.
स्वतः भोवतीच्या परिघाला जग समजण्याचा स्वतःपुरता समजूतदारपणा (?) निसर्गातून मिळणाऱ्या आनंदातील सहजपणा हरवून टाकतो. प्रत्येक गोष्टींमध्ये माणूस प्रतिष्ठा शोधू लागतो. स्वनिर्मित कुंपणामध्ये बंदिस्त होताना त्यापलीकडील देखण्या जगाला विसरतो. पंचवीस-तीस वर्षापूर्वीच्या माझ्या जगण्यातील सहजपण हातून निसटले ते निसटलेच. ते पुन्हा हाती येईल का, माहीत नाही. निरामय आनंदाचा झरा व्यावहारिक शहाणपणाच्या सानिध्यात आटत चालला आहे. मनाच्या सांदिकोपऱ्यात तो काळ आक्रसून लपला आहे. आठवणींवर काळाची धूळ साठली आहे. पहिल्या पावसाच्या आगमनाला प्रतिसादाचा सहज हुंकार देणारा मृद्गंध दूरदूर कुठेतरी राहिला आहे. कोणत्यातरी पुस्तकातील वाक्यातून मातीचा दरवळ घेऊन सोबतीला क्षणभर आला, पण त्याचा मूळचा गंध हरवून. कधीकाळी मनाच्या आसमंताला भरून उरणारा तो गंध आसपास आजही आहे, याची गंधवार्ताही जगण्याच्या धडपडीत नाही. हे जगणं परिस्थितीशरण अगतिकतेतून अगदी सहज स्वीकारले आहे.
आयुष्यातील बराचकाळ खेड्यातील मातीच्या सानिध्यात, निसर्गाच्या निर्व्याज सहवासात व्यतित झाला. निसर्गाचे नावीन्याने नटलेले सारे आविष्कार नाना रंग धारण करून पावलोपावली रोजच भेटत राहिले. प्रत्येक ऋतूत पालटणारी त्याची नानाविध रूपं मनात साठत गेली अन् घट्ट रुजत गेली. अनंत जलधारा बनून पाऊसकाळ हृदयात विसावला आहे. त्या क्षणांना चिंब भिजवणारा पाऊस मनाला नुसताच पुलकित करीत गेला असे नाही, तर समृध्दही करीत गेला. तेथें रुजलेलं पाऊस नावाच्या आठवणींचं रोपटं वाढत्या वयासोबत नवनवे रूपं घेऊन बहरत राहिले. त्याचं रिमझिमणं, बरसणं, धोधो कोसळणं अनवरत सोबत करीत राहिले. भेटत राहिले. आनंद बनून मनाच्या आसमंताला असीम, अमर्याद करीत गेलं. म्हणूनच की काय पुस्तकातल्या कवितेतून भेटणारा पाऊस अन् ती कविताही हवी हवीशी वाटू लागली. धडा, कविता वाचताना तो आपल्यासमोर उभा असल्याचे वाटायचे. बालकवींच्या कवितेतील श्रावणमास हिरवाई घेऊन मनातील भावनांना गहिरा रंग द्यायचा. त्या घनगर्द छटा गहिऱ्या होत जायच्या. पाऊस सर्जनाचा साक्षात्कार होऊन मनात साठत राहायचा. त्याच्या विभ्रमाना पाहताना मनाला सुखद भ्रम होत राहायचा.
मधल्या सुटीनंतर दुपारची शाळा भरलेली असायची. शिक्षक वर्गात काहीतरी शिकवत असायचे. सगळी मुलं वर्गात शांतपणे बसलेली असायची. पण डोळ्यांची भिरभिरणारी पाखरं मात्र खिडकीतून दिसणाऱ्या पश्चिमेकडील आकाशाच्या तुकड्याकडे झेपावत असायची. तेथे विहरत रहायची. आकाशाचे रंग पालटत जायचे. काळ्या रंगांची चादर त्यावर ओढली जायची. काळ्याशार रंगाने आकाश रंगायचे. इकडे आमची मने बरसणाऱ्या पाण्याने रंगायची. आमची अस्वस्थ चुळबूळ सुरु व्हायची. सरांचं लक्ष आमच्याकडे. "काय चाललंय?" म्हणून डोळ्यावरील चष्म्याच्या काचांवरून पाहत ओरडायचे. तेवढ्यापुरतं त्यांच्याकडे लक्ष. मनं मात्र आभाळाकडे केव्हाच पोहोचलेली. पुस्तकातील धडे मस्तकापर्यंत पोहोचणे अवघड होत जायचे. पुस्तकातल्या धड्यातील रंगापेक्षा बाहेरील पावसाचा रंग अधिक हवासा वाटायचा. पुस्तकातील धडे त्यांच्या तालात चालत राहायचे; पण आमच्या मनात पावसाने एव्हाना चांगलाच ताल धरलेला असायचा.
आमच्यातील कोणीतरी उभं राहून सरांना सांगायचा; "सर, पाऊस जोराचा येईल असं वाटतंय! आम्ही घरी जायचय का?" सरांचाही नाईलाज असायचा. शाळा गावापासून दीडदोन मैल अंतरावर. चिखलमाती, काट्याकुट्यातून तो रस्ता रोजच पायी तुडवत जावे लागायचे. पाऊस आला की रस्त्यावरील नाले, ओढे तुडुंब भरून वाहयचे. पाणी कमी होईपर्यंत इकडची माणसं इकडे आणि तिकडची तिकडे अडकून राहत असतं. पाऊस येणार असला म्हणजे शाळेतून घरी जाण्याची आम्हां पोरांना अनुमती असायची. दप्तर स्थानिक राहणाऱ्या मित्रांकडे नाही तर शाळेतच टाकून घरी जाण्यासाठी सारे भन्नाट सुटायचे. रस्त्यावरून चिखल, माती, पाणी उडवत, बोंबा मारीत निघायचे. जोराचा पाऊस येऊन ओढे, नाले नेहमीच तुंबायचेत असे नाही; पण पावसामुळे शाळा नावाच्या कोंडवाड्यातून काही वेळेसाठी का असेना आमची सुटका व्हायची. शाळा नावाच्या तुरुंगातून आम्हांला मुक्त करणारा पाऊस मुक्तिदाता वाटायचा. वाटायचे, हा असाच वर्षभर बरसत राहावा. मात्र सुटीचा दिवस सोडून. यासाठी आम्ही पावसाला मनातल्यामनात तशी विनंतीही करायचो; पण त्याने कधीही आमचे म्हणणे ऐकले नाही.
वाढत्या वयासोबत पाऊसही बदलत गेला. कधीकाळी कथा, कादंबरी, सिनेमातून नायक-नायिकांना चिंबचिंब भिजवणारा पाऊसच खरा पाऊस असतो, असे वाटायचे. पण तो फक्त पुस्तकांत, चित्रपटात राहिला. वास्तवात असा पाऊस आयुष्याच्या चालत्या वाटांवर कधी भेटलाच नाही. पुस्तकातून वाचताना भेटलेला, मनमुराद आनंदाची बरसात करणारा पाऊस हवाहवासा वाटायचा. पण कोसळताना, धूळधाण करताना त्याला पाहिला, अनुभवला तेव्हा तो नकोसाच वाटायला लागला. त्याचं येणं हाच जीवनातील शाश्वत आनंद आहे, असे मानणारी मने; तो संततधार लागताना त्रासायची. वैतागायची. गावातील घरांनी सिमेंटची छते आपल्या डोक्यावर तेव्हा धारण केलेली नव्हती. सगळ्यांची घरे मातीची, धाब्याची. संततधार लागल्याने सारखी गळायची. धाब्यावरून गळणाऱ्या पाण्याने वैताग यायचा. घरात अंतरावर, अंतरावर भांडी आपलं आसन मांडून स्थानपन्न व्हायची. आई ओरडायची. छतावर मुंग्यांनी केलेली घरे मातीच्या पाट्या टाकून, बुजून गळती थांबवायला लागायची. पावसात छतावर चढून भिजताना माती टाकणे जिवावर यायचे. अंधाऱ्यारात्री धोधो बरसणाऱ्या पावसात हाती कंदील घेऊन डोक्यावरील गोणपाटाच्या घोंगडीला सावरत गोठ्यातल्या गायीवासरांना, बैलांना चारा टाकायला जाताना पावसाला बिनदिक्कत शिव्यांची लाखोली वाहिली जायची. पण त्याचा काही उपयोग नसायचा. तो आपलं कोसळण्याचं काम प्रामाणिकपणे करीत राहायचा.
शेतात खूप कामे असली की, तो अवचित यावा. चांगला जोराचा यावा असे वाटायचे. कारण शेतात वाफसा नसल्यावर ना निंदणी, ना कोळपणी. त्यादिवशी कामातून सुटका व्हायची. पण हाही आनंद तसा क्षणिकच असायचा. पाऊस कमी असेल, थोडी उघडीप मिळाली असेल, तर गोठ्यातली गुरंवासरं चरायला न्यावी लागत. हे काम टळत नसे; पण त्यातल्या त्यात बरे वाटायचे. आम्ही सगळीच समवयस्क मुले आपापली गुरंढोरं घेऊन माळावर एकत्र येत असू. सगळे जमल्यावर कधी सूरपारंब्यांचा तर कधी विटीदांडूचा खेळ रंगत आलेला असायचा. सारे खेळण्यात रंगलेले असायचे. आमच्यातल्याच काही लहान मुलांना गुरावासरांवर नजर ठेवायला सांगून मोठी मुले खेळत असायची. त्यांचं खेळणं पाहून लहान मुले आपलं काम विसरून खेळ पाहण्यात रमायची. तेव्हाशी नजर चुकवून दोनचार ओढाळ ढोरं शेजारच्या कोणत्यातरी शेतात घुसायची. योगायोगाने शेतमालक शेतात असला की, शिव्यांची बरसात करीत, बोंबलत यायचा. अशावेळी न बोलणंच शहाणपणाचे असायचे. हे शहाणपण अनुभवातून आम्ही चांगल्याप्रकारे आत्मसात केले होते.
शाळा शिकता, शिकता वर्ग वाढत गेले. तसा पाऊसही आठवणीतून वाढत, साठत गेला. शालेय वयातील भाबडा, निरागस पाऊस वाढत्या वयासोबत बदलत गेला. परिस्थतीची वास्तवता अनुभवात, अनुभवातून जीवनात प्रवेशित झाली. कथाकादंबऱ्यामधून रोमँटिक रुपात भेटणारा पाऊस कितीही खास, कितीही चांगला वाटत असला, तरी परिस्थतीच्या दाहकतेत तो रुक्ष होतो. हे कळायला लागले. त्याच्या याही रूपाशी हळूहळू परिचित झालो. त्याच्या आगमनाच्या वाटांशी शेतकऱ्याच्या जीवनाचे चक्र बांधले गेले असल्याने माणसं त्याच्या येण्याने का आनंदतात, न येण्याने विकल का होतात, हे कळायला लागले. पाऊसही प्रत्येकाचा वेगळा आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो. आपला पाऊस वेगळा आणि शहरातल्या लोकांचा वेगळा, असे वाटायचे. त्यांच्यासाठी आनंदाची बरसात करणारा. आपल्यासाठी राबराब राबून कष्टाचे डोंगर उपसायला लावणारा. कधी आला नाही म्हणून, तर कधी प्रमाणापेक्षा अधिक येऊन कोसळला म्हणून माणसं हमखास त्याच्या नावाने बोटं मोडत असत. त्याच्या अनियमित येण्याने उध्वस्त होणाऱ्या माणसांच्या डोळ्यातून कोसळताना पाहत होतो. तो दिसत होता. जाणवत होता. त्याचे अस्तित्व माणसांच्या जीवनाला, जाणीवांना वेढून टाकणारं असायचं. पाऊस सर्जनाचा साक्षात्कार वगैरे असल्याचे वाचलेलं अशावेळी आठवायचे. वाटायचं हा आलाच नाही तर... आपलं कसं व्हायचं? त्याचं येणं लांबल्याने घरातील कर्त्या मंडळीच्या चेहऱ्यावरील चिंतेचे सावट मनातलं आनंदगर्भ आभाळ काळवंडून टाकायचं. पण आशावादी मन हलकेच म्हणायचं, असं नाही होणार.
पावसाच्या गंधगार सहवासाच्या हिंदोळ्यावर झुलत कधी अभावात, तर कधी अविर्भावात जगलो. वाढलो. पावसाने त्याच्या धारांसोबत मनाचा आसमंत भिजवत परिस्थतीच्या मातीत रुजवले. शिकलो. चार पुस्तकांची सुंदर सोबत घडली. जगण्याच्या शाश्वत वाटा परिस्थितीतून सापडल्या, तशा पुस्तकातूनही सापडल्या. पदवीधर, द्विपदवीधर झालो. अंगावरची ठिगळांची नक्षी लागलेली कापडं गेली. परीटघडीचे कपडे परिधान करून वेगळ्या चौकटींच्या जगात आलो. परिस्थितीने शिकवलेल्या शहाणपणामुळे मिळालेल्या धड्यातून स्वतःला सिद्ध करीत गेलो. स्वतःला लेखत गेलो. तपासत गेलो. जगण्याने अस्तित्वाच्या भूमीत मुळं घट्ट रुजवली. काही मी शिकलो. काही अनुभवाने शिकवले. नोकरीच्या वाटेने पावलं गावातून बाहेर पडली. आलो शहराच्या आश्रयाला. विसावलो येथेच निवांत. उपजीविकेच्या शोधात गाव सुटला; पण गावातील आठवणी सोबतच राहिल्या. अजूनही त्या मनातलं गाव समृद्ध करीत आहेत. अशा कशा सहज सुटतील त्या! आठवणींचा पाऊस कधीतरी असा अवचित आभाळभरून कोसळतो. मनात साठलेले आठवणींचे मेघ झरायला लागतात. मनातील आसमंताच्या क्षितिजावर आठवणींच्या इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान धरून कोसळणारा पाऊस रिमझिम बरसत राहतो. आठवणींचा ऊनपावसाचा खेळ सुरु होतो. मनातील गाव आणि गावातील पाऊस सोबत घेऊन शहराच्या सिमेंटच्या छतावरून ओघळत राहतो, आठवणींच्या रूपाने.
No comments:
Post a Comment