..🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
कै. शरणप्पा मलंग विद्यालयात इंदिरा गांधी यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा.
आज दिनांक 19 नोव्हेंबर 2019 रोजी मलंग विद्यालयामध्ये 19 नोव्हेंबर हा दिन भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म दिन राष्ट्रीय एकता दिन म्हणून आमच्या मलंग
विद्यालयामध्ये अतिशय उत्साहात मध्ये साजरा करण्यात आला.
*या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री अजित गोबारे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदीराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर व या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख श्री राजकुमार जाधव सर उपस्थित होते.*
*भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केल्यानंतर प्रमुख वक्ते श्री राजकुमार जाधव सर यांचे इंदिरा गांधींच्या जीवनातील* *आदर्श या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना ते म्हणाले की देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी गाणं कोकिळा लता* *मंगेशकर व राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील या महिला म्हणजे भारतीय इतिहासातील ईश्वरीय चमत्कार आहे कारण लता मंगेशकरांचे गाणे आणि इंदिरा गांधी यांचे धोरण याची बरोबरी संपूर्ण जगामध्ये कोणीही करू शकले नाही. याचा आपणाला सार्थ अभिमान आहे. 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाबाद येथे* *भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व माता कमला देवी यांच्या पोटी या महान भारतीय श्री रत्न इंदिरा गांधी यांचा जन्म झाला. चेहऱ्यावरती सूर्यासारखे तेज प्रखर बुद्धिमत्ता आणि देशाविषयीचे प्रेम बाल पणापासूनच त्यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिले वयाच्या अकराव्या वर्षी वानरसेना लहान मुलांची संघटना करून भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळी मध्ये असे योगदान दिले की मोठ-मोठ्या क्रांतिकारकांना या चळवळीचे दाद घ्यावी लागली. त्याच वेळेस संपूर्ण देशाला कळले की ही* *अल्लड मुलगी नसून भविष्यात देशाची कणखर नेतृत्व करेल हे त्यांनी ओळखले कमी वयामध्ये त्या वडिलांसोबत संसदेमध्ये प्रवेश केल्या आणि अगदी बालपणातच राजकारणाचे धडे गिरवू लागले आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस मध्ये* *स्वतःचा सहभाग नोंदवला आणि त्या तरुण राजकारणी महिला म्हणून सर्वांना परिचित होऊ लागल्या पण त्यांनी शिक्षणाकडे थोडेही दुर्लक्ष केले नाही म्हणून त्यांना जगातील सर्व उत्कृष्ट विद्यापीठाने डॉक्टरेट पदव्या बहाल केल्या व त्या भारताचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळामध्ये माहिती व नभोवाणी मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. तेव्हापासून त्यांनी जो राजकारणात प्रवेश केला तो* *अखेरपर्यंत यशस्वी यशस्वी ठरला आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण, अनुचाचण्या आणि पाकिस्तान सोबत छेडलेले युद्ध असे यशस्वी कार्यक्रम राबवल्या व त्या भारताच्या यशस्वी पंतप्रधान म्हणून आपला जीवनप्रवास यशस्वी करून दाखवला त्यांची ही यशोगाथा लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या जरी आज आपल्यात नसल्या तरी "मरावे परी कीर्तिरूपे उरावे" या म्हणीप्रमाणे भारतीय लोकशाही जोपर्यंत भारतात* *आहे, तोपर्यंत त्या अमर राहतील म्हणुन त्यांच्यापासून विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य उज्वल करण्याचा शोध घेतला पाहिजे असे ते म्हणाले.*
*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री विवेकानंद पाचंगे सर यांनी मानले.*
*हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील अगतराव मुळे, बालाजी हिप्परगे, परमेश्वर कोळी, कलशेट्टी पाटील, प्रभावती बिराजदार, मीनाक्षी हत्ते, मोहन साखरे, दुषंण कांबळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹