Friday, 23 July 2021

शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली

 




 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


*शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.*

*https://malangvidhyalay.blogspot.com*

   *उमरगा दि. 23/07/2021 वार शुक्रवार रोजी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये गुरु पौर्णिमा उत्सवामध्ये साजरी करण्यात आली जरी करोना प्रादुर्भावामुळे शाळेमध्ये मुले प्रत्यक्ष नसले तरी प्रतिनिधिक स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांनी येऊन शिक्षकांचे स्वागत केले व गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.* 

   *कार्यसम्राट शरणप्पा मलंग अप्पा यांच्या प्रेरणादायी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आद्यगुरू महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी, नववी व दहावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करीत असताना श्री अजित गोबारे सर म्हणाले की गुरु विना शिष्य अधुरा असतो म्हणून जो विद्यार्थी शिष्यत्वाचे आदर्श गुण धारण करतो तोच विद्यार्थी आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करतो. आज ऑनलाइन शिक्षणामुळे गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये स्पर्धा चालू झाले असे चित्र सर्वत्र निर्माण होत आहे असे असले तरी एकदा काय झाले गुरुच्या खेळाच्या तालमीमध्ये तयार झालेला पैलवान आपल्या गुरु सोबतच कुस्ती धरण्यासाठी ललकारू लागला तेव्हा गुरूनेही त्याच्यासोबत लढण्याची तयारी दर्शवली पण काय चमत्कार पहील्याच डावांमध्ये गुरूने शिष्याला आसमान दाखवले तेव्हा शिष्य मोठ्याने गुरूशी वाद घालू लागला आयुष्यभर मी तुमच्या हाताखाली तालीम केली पण तुम्ही हा डाव मला का शिकवला नाही तेव्हा गुरु म्हणाले तुला शिकवत असतानाच माझ्या लक्षात येत होतं की तू एक दिवस मला आव्हान देणार म्हणून हा डाव तुझ्यासाठी राखून ठेवला होता. यामधून सांगायचे तात्पर्य हेच की गुरु शिष्याने एकमेकाशी लडत बसण्यापेक्षा गुरूच्या आशीर्वादाने शिष्याने आयुष्यामध्ये खूप पुढे जायचे असते विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा गुरुला अभिमान वाटला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी गुरूंचे ऋण आयुष्यभर आपल्या लक्षात ठेवले पाहिजे गुरु, आई आणि वडील त्यांचा आशीर्वाद मिळालेला शिष्य आयुष्यामध्ये कधीही अपयशी ठरू शकत नाही असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परमेश्वर सुतार सर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार श्री परमेश्वर कोळी यांनी मानले.*

   *या कार्यक्रमासाठी मलंग विद्यालयातील शिक्षक श्री राजकुमार जाधव, श्री अगतराव मुळे, श्री सतीश कटके, श्री विवेकानंद पाचंगे, श्री बालाजी हिप्परगे, श्री कलशेट्टी पाटील, श्रीम. प्रभावती बिराजदार, श्रीम. मीनाक्षी हत्ते, श्री मोहन साखरे, श्री दुषंत कांबळे इत्यादी उपस्थित होते.*



🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹