Saturday, 29 December 2018
Tuesday, 27 November 2018
Sunday, 28 October 2018
*राज्य धनुर्विद्या स्पर्धेत शरणप्पा मलंग वि.ची विद्यार्थिनी,धनुर्धर कु.आर्या सुरेंद्र वाले हिला सुवर्ण पदक
आज दिनांक 27/10/2018 वार शनिवार रोजी वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ.सुरेखाताई मलंग यांच्या हस्ते आर्याचा सत्कार करण्यात आला.
उस्मानाबाद येथे चालू असलेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा या शाळेतील इयत्ता आठवीत शिकणारी एक गुणी व मेहनती खेळाडू कु.आर्या सुरेंद्र वाले हिने 14 वर्षाखालील गटात *1024 गुण* घेऊन महाराष्ट्रात प्रथम स्थान पटकाविले आणि आर्या सुवर्ण पदकाची मानकरी ठरली
आर्याने पुण्याची खेळाडू जी की सतत तिन वर्षे राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविते तिला हरवून हे यश संपादन केले आहे ,पुण्याची खेळाडू1023 गुण घेऊन द्वितीय आली व 1 गुणाने आर्याने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
आर्याच्या या यशाच्या पाठीमागे खरे शिल्पकार आहेत तिचे पालक तसेच तिचे मार्गदर्शक श्री सुरेंद्र वाले सर व मलंग शाळेचे मुख्याध्यापक श्री गोबारे सर आणि सर्व शिक्षक स्टाफ.
याप्रसंगी वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम.एस.मलंग साहेब, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष एस.के.मलंग ,सदस्य व्ही.के. पाटील,आप्पासाहेब हत्ते
मुख्याध्यापक गोबारे सर,मुख्याध्यापक रेड्डी सर आदी मान्यवर.
या यशाबद्दल दिनांक 29/10/2018 वार सोमवार रोजी उमरगा शहरात, सकाळी ठीक 10 वाजता उमरग्यातील सर्व क्रीडाप्रेमी,वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ,संचलित कुमारस्वामी प्रा.विद्यामंदिर आणि शरणप्पा मलंग विद्यालय यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे,तरी जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी सहभागी होऊन आर्याला प्रेरणा द्यावी असे आव्हान संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
Thursday, 11 October 2018
Saturday, 6 October 2018
कै. शरणप्पा मलंग विद्यालयांमध्ये तालुकास्तरीय वाद विवाद स्पर्धा संपन्न.
कै. शरणप्पा मलंग विद्यालयाच्या तालुकास्तरीय वाद-विवाद स्पर्धेत डॉ के. डी. शेंडगे शाळेचा संघ प्रथम
दि. 06/10/2018 कै. शरणप्पा मलंग विद्यालय येथे कै. शरणप्पा मलंग आप्पा यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा विषय होता सोशल मीडियाचा वाढता वापर विद्यार्थ्यांसाठी तारक की मारक या गाजलेल्या तालुकास्तरीय वाद विवाद स्पर्धेमध्ये तालुक्याच्या एकूण 19 नामांकित शाळांनी आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विभागीय उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले उपस्थित होते तर प्रमुख पाहुण्या मध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर चे प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड व उमरग्याचे पर्वेक्षक कालावधीन तशिलदार कु. सुप्रिया सुळे उपस्थित होते. तर परीक्षक म्हणून प्रा. डॉ. एम. एस. चिश्ती मॅडम, गटशिक्षण कार्यालयाच्या विशेष साधन व्यक्ती श्रीमती पी.जी. माशाळकर मॅडम आणि प्रा. परमेश्वर सूर्यवंशी त्यांनी काम पाहिले. सोशल मीडियाचा वाढता वापर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी तारक म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोबाईल हे आपले उच्च ध्येय साध्य करण्याचे प्रभावी साधन असून विज्ञानाच्या पुढची ही तंत्रज्ञान क्रांती आहे. मानवी जीवनाला परिपूर्ण विकसित करण्यासाठी मोबाईल सारखे प्रभावी माध्यम नाही जगाच्या मानवाचा प्रगत इतिहास पाहून मुले आपले उज्वल भविष्य घडवू शकतात मोबाईल हे विद्यार्थ्यांचे घरातील क्लासरूम असून प्रगती पर्यंत पोहोचण्याचा स्वस्त आणि मस्त मार्ग आहे. आज विद्यार्थ्यांना ओस पडत चाललेल्या शाळा कुठे विद्यार्थी आहेत तर शिक्षक नाहीत विद्यार्थी शिक्षक आहेत पण इमारती नाहीत तर कोठे शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे त्यावर मात करून जगाच्या स्पर्धेत तांडे वाडी वस्त्या वरील विद्यार्थ्यांना जगाच्या शैक्षणिक स्पर्धेत उतरवायचे असेल तर मोबाईल ला पर्याय नाही असे आग्रहाचे मत व्यक्त केले.
तर मारक बाजूने आपले विचार मांडत असताना तुम्हाला सिद्धी हवी की प्रसिद्धी विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल दिल्याने विद्यार्थ्यांना चांगले काय आणि वाईट काय हे कळत नसल्याने मुले मोबाईल वेडे होत आहेत. सुधारण्यासाठी तारुण्याचा काळ खूप मोठा आहे बालपणीच मोबाईलच्या अति प्रभावाने मुले नको त्या वयात वाईट मार्गाला लागत आहेत. लैंगिक अत्याचारापासून ते आत्महत्या करण्यापर्यंत ही कोवळी मुले सोशल मीडियाच्या आहारी जात आहेत तासनतास मोबाईलच्या टीव्हीच्या समोर बसल्याने मानसिक अजारापासून ते शारीरिक आजाराला बळी पडून कायमचे स्वास्थ्य बिघडवून घेत आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आईच्या गर्भातच मुल संस्कार शिकत असेल तर टीव्ही मालिका पाहणाऱ्या आईकडून काय संस्कार मिळत असतील म्हणून उद्या जन्मनारी मुले आईच्या गर्भातूनच मालिकेतील जाहिराती मनत येतील तर काही मुलांनी सासु सुन मधील घरातील संवाद कसे बिघडत आहेत हे सांगताना व्हाट्सअप पाहत स्वयंपाक करतेस म्हणून करपुन गेली दाळ सुनबाई तुझा मोबाईल चुलीत जाळ अशा ओव्या म्हणून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या एकूण 38 विद्यार्थ्यांनी दिवसभर चालवलेल्या वाद विवाद मध्ये आपल्या विचाराने सभागृह दणाणून सोडले.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग साहेब, सचिव सौ. सुरेखाताई मलंग, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री एस.के.मलंग साहेब, ज्येष्ठ सदस्य व्हंडरे साहेब, श्री विजय कुमार पाटील साहेब, श्री अप्पु हत्ते, श्री कल्याणी मलंग,कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर व कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदीराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना श्री अजित गोबारे सर म्हणाले गेल्या पंधरा वर्षांपासून चालत आलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रभावी वक्ते घडवले असून अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी मिळवून दिली आहे. हे वर्ष कैलासवासी शरणाप्पा मलंग यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम या वर्षी घेण्यात येणार आहेत हे केवळ विद्यार्थ्यांचे वाद विवाद स्पर्धा घेण्याचे व्यासपीठ नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणांना वाव देणारे कृती मंच आहे असे ते म्हणाले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विठ्ठल उदमले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शाळेत होणाऱ्या सामान्य ज्ञान स्पर्धेकडे संधी म्हणून लक्ष द्या भविष्यात ही संधी माझ्यासारखा तशिलदार कलेक्टर बनवेल असे ते म्हणाले तर प्राचार्य श्रीकांत गायकवाड यांनी स्पर्धा परीक्षा पास नाही झालो तर कलेक्टर नाही बनलो तरी खूप अभ्यास करा माझ्यासारख्या गाजलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य व्हाल म्हणून मी पारितोषिक जिंकलेल्या नव्हे तर हार पचवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे. आयुष्यात हार पचवालतर एक दिवस गळ्यामध्ये यशाचे पुष्प हार पडतील असे मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व शाळेच्या उपस्थित संघाचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सर्व द्वितीय येण्याचा मान भारत विद्यालय उमरगा या संघाने मिळवला तृतीय पारितोषिक प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूम ने पटकावले तर उत्तेजनार्थ पारितोषिक जय स्वामीनारायण विद्यालय समुद्राळ या शाळेने पटकावला तर बऱ्याच शाळेच्या वादीने व प्रतिवादीने एक तर्फे जोरदार मतप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी इतर शाळेतील मार्गदर्शक शिक्षक पालक व निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परमेश्वर सुतार सर यांनी केले तर आभार श्री बालाजी हिप्परगे सर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राजकुमार जाधव, श्री अगतराव मुळे, श्री सतीश कटके, श्री विवेकानंद पाचंगे, श्री परमेश्वर कोळी, श्री कलशेट्टी पाटील, श्री जयदीप पाटील, श्रीमती प्रभावती बिराजदार, श्रीमती मीनाक्षी हत्ते श्री मोहन साखरे, श्री दुशंत कांबळे आदीनी परिश्रम घेतले व हा कार्यक्रम यशस्वी केला.
Wednesday, 3 October 2018
Monday, 1 October 2018
कै. शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती व पालक मेळाव्याचे आयोजन
उमरगा दि. 02/10/2018 कै. शरणप्पा मलंग विद्यायलयामध्ये 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती पालक मेळाव्याचे आयोजन करून साजरी करण्यात आली. महात्मा गांधीजी यांची शिकवण विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही आत्मसात करावी लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून या जयंतीला विद्यार्थ्यांच्या पालकांना ही निमंत्रित करण्यात आले होते. या पालक मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र चाचणी परीक्षेचा निकाल देण्यात आला व इयत्ता आठवी, नववी,दहावी मराठी व सेमी माध्यमातुन प्रथम, द्वितीय,तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तसेच गोळा फेक या खेळ प्रकारांमध्ये विभागावर निवड झालेल्या शोएब इनामदार तसेच धनुर्विद्या खेळ प्रकारांमध्ये विभाग स्तरावर निवड झालेल्या कु. आर्या वाले व कु. मोहिनी स्वामी या खेळाडूचा व त्यांच्या पालकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त श्री बालाजी हिपरगे सर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले तर शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री अजित गोबारे सर यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना वाढत्या स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन पाल्याच्या अभ्यासाकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री एस.के.मलंग तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श पालक श्री दिलीप जवळगे व प्रमुख पाहुण्यामध्ये शाळेचे सदस्य श्री अप्पु हत्ते व कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर आचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परमेश्वर सुतार सर यांनी केले विवेकानंद पाचंगे सर यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.
Saturday, 29 September 2018
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा*
आज दि.29/09/2018 रोजी *जिल्हास्तरीय* शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 2018
गोळा फेक या क्रीडा प्रकारांमध्ये 17 वर्ष वयोगटामधून प्रथम क्रमांक *कु. इनामदार शोएब महेबूब* या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल *वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा* व *कै. शरणप्पा मलंग विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Subscribe to:
Posts (Atom)